शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

रामनगर पेठ वसवण्यासाठी शिवरायांनी दिलेला कौलनामा !!

समर्थ रामदास स्वामी शिवथर (मौजे पारमाची कोड नलवडा) येथे रहावयास आले. त्यांनी रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा केली व १२ वर्षे दिवाणास हासील माफ म्हणून कौल दिला. त्याबरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७६ मध्ये उदमी, व्यापारी मंडळींना रामनगर पेठ वसविण्यासंदर्भात व या ठिकाणी १२ वर्षे दिवाणास हासील माफ म्हणुन कौल दिल्याचे पत्र.
                
!!शिवरायांची अष्ठकोणी राजमुद्रा!!
                                                            १५९७ भाद्रपद व. ८

                                          श्रीरामदास



कौलनामा अजरख्तखाने राजश्री शिवाजी राजे साहेब दामदौलतहू ता। मोकदमानी उदमीयानी व बाजे लोकानी पेठ रामनगर दरवास कोड नलवडा मौजे पारमाची ता। सिवतर सुहुरा सन सीत सबैन व अलफ बादे कौलनामा ऐसा जे कोडमजकुरी श्री                येउनु राहीलियाउपरी पेठ    
                वसवयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल
                देवीला त्यावरून तुम्हास कौल दिधला असे हरकोण्ही मानेल ते पेठे मजकुरास                   येउनु राहणे व आमदरफ्त करीत जाणे उदीम वेवसाउ सौदागरी जे करणे असेली ते करीत जाणे दिवानास हासील बारा वरसे इ॥ सालमजकुरा पासूनु होत तोवरी माफ असे काही घेणार नाही व आजार व तसवीस लागणार नाही बारा वर्षाउपरी दिवान हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजुर मोर्तब सुद. 

                                                         मर्यादेयं विराजते 
                                                        ही समाप्ती मुद्रा 


तेरीख २१                                               एकविसावा माहे जमादिलाखर
जमादिलाखर                                                         सुरु सुद बार


३ टिप्पण्या:

  1. हया पत्रावरून हे स्पष्ट होते शिवकाळात शिवथर हा तर्फे (तालुका ) असून समर्थ रामदासस्वामी यांचे वास्तव्य नलावडा कोंड म्हणजे सध्याचे रामदास पठार हे गाव आहे. हया गावातील मंदिराची जागेला आज ही सात बारा वर मठाचा माळ हे नाव आहे.हया जागेवर समर्थ असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे कल्याण स्वामी यांचे दिवाकर गोसावी यांचे पत्र.त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की समर्थ शिवथर प्रांतातील नवलवाडी कोंड मौजे पारमाची असा आहे.समर्थ वास्तव्याचा पत्ता उघड असताना श्री शंकर देव हे तत्कालीन शिवथर गाव येथे शिवथरघळ आहे अस चुकीचे अनुमान काढले. 2009 ला रामदास पठार हया गावच्या पासून 600 मीटर वर एक गुहा आहे तीच खरी शिवथरघळ आहे अस सम्पूर्ण पुराव्यातून श्री सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी सिद्ध केल. त्या गूहेच्या जागेला आज ही सरकार नोंदीनुसार नाव मठाचा माळ आहे. सुमारे 1100 चौमी असून सम्पूर्ण गुहेत आपण उभे राहू शकतो. अधिक माहिती साठी realshivtharghal.blogवर मिळेल.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा