बुधवार, २४ एप्रिल, २०१३

शंभूराजांना पकडून देणारे फितूर कोण होते??? ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग २ )


सध्या महाराष्ट्रात विद्रोही चळवळीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करण्याची चढाओढ सुरु आहे. ब्राम्हणांनी लिहिलेला इतिहास खोटा आहे आणि आम्ही सांगतो तोच इतिहास खरा ह्या मानसिकतेतून इतिहासाचे किती नुकसान हि मंडळी करणार आहेत देव जाणे??


खोटा इतिहास लिहिण्यात सध्या आघाडीवर असलेले खेडेकर आणि कोकाटे यांच्या खोट्या इतिहासाचे वस्त्रहरण आम्ही आमच्या पुढील लेखांतून करणार आहोत. यात आम्ही आमच्या मनाचे असे काही सांगणार नसून केवळ अस्सल दस्तावेजांच्या आधारे हि वस्त्रहरण मालिका चालवणार आहोत. असो.

तर  मराठा सेवा संघाचे खेडेकर हे आपल्या पुस्तकातून किती खोटा इतिहास पसरवत आहेत हे आपण पाहूया.

खेडेकर यांना समर्थ रामदास स्वामी यांचा खूप तिटकारा असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते. तो इतका कि,  समर्थ रामदास स्वामी यांच्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी खेडेकर सोडत नाहीत. समर्थ द्वेषापोटी खेडेकर किती खोटे बोलत आहेत याचा परिचय आपल्याला या लेखात होईल.

शंभूराजेना पकडून देण्यासाठी फितूरी केली म्हणून इतिहास शंभू राजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांना फितूर म्हणून ओळखतो. इतिहासकार या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यामागे काही पुरावे आहेत. पण ऐतिहासिक पुरावे काय असतात हे ऐकून देखील माहित नसलेले खेडेकर कोणताही पुरावा न देता शंभूराजाना पकडून देण्याचा आणि दगाबाजी करण्याचा संबंध समर्थ शिष्यांशी जोडतात.

 आपल्या साहीत्यीक युवराज संभाजीराजे.” या पुस्तकात पान क्रमांक १५ वर खेडेकर लिहितात
"शंभुराजांना गणोजी शिर्के या येसुबाईंच्या भावाने फितुरीने पकडुन दिले हे चुक खोटे आहे. रामदासी ब्राम्हण रामदास शिष्य रंगानाथ स्वामी या ३०० ब्राम्हण रामदासींनी खरा विश्वासघात केला. त्यांची हरामखोरी झाकण्यासाठी कनौज ब्राम्हण कवी कलश गणोजी शिर्के यांना ब्राम्हणांनी बदनाम केले."



परंतु इतिहास हा पुराव्यांनी बोलत असतो. बहुदा हे खेडेकराना माहित नसावे. पण खेडेकर खोटे बोलत आहेत याचा पुरावा आमच्याकडे आहे. संभाजी राजे आणि गणोजी शिर्के यांच्यामध्ये दाभोळच्या वतनावरून वाद झाला होता.

मुळात दाभोळचे वतन हे एका ब्राम्हणाचे होते. पुढे त्या ब्राम्हणास आदिलशहाने बलात्कारे मुसलमान केले. दरम्यान सूर्यराव सुर्व्यांच्या पदरी असलेले पिलाजी शिर्के यांच्याशी आपली कन्या सुर्व्यानी विवाह करून दिली. आणि दाभोळच्या वतन शिर्क्यांना मिळावे म्हणून सुर्वे आदिलशहाकडे बोलणी लावणार होते. पण त्या आधीच शिवरायांनी दाभोळ मिळवले. पिलाजी शिर्के शिवरायांकडे चाकरीला गेले पण दाभोळचे वतन मिळवण्याचा अंतस्थ हेतू ठेवून. पुढे शिवाजी महाराज यांच्या निर्वाणानंतर पिलाजी शिर्के यांनी संभाजी महाराजांकडे दाभोळच्या वतनासाठी बोलणी चालू केली. परंतु शंभूराजांनी शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत सुरु करण्यास नकार दिला. त्यापुढे पिलाजी शिर्के काही न बोलता काल कंठत राहिले. पण त्यांच्या मृत्युनंतर गणोजी शिर्के मोगलांना सामील झाला.

आमच्या या कथनाला पुरावे खाली देत आहे.

 दाभोळ येथील देशमुखी वतन पुर्वी ब्राह्यणाचे होते. ----आदीलशाही बादशाहाने त्या ब्राह्यण  देशमुखास मुसलमान केले. दाभोळचे देशमुखी वतन अमानत केले. ते कित्येक  वर्षे अमानत असतां  शृंगारपुरी रा!. सुर्याजीराजे सुर्वे प्रभानवलीकर होते.  त्यांनी आपली लेक  रा!. पिलाजीराऊ  शिर्के ह्यांस देऊन सोयरीक केली. तेव्हा बादशाहास विजापुरी  अर्ज  पोहोचवुन पिलाजीराव ह्यांस दाभोळ मामल्याची देशमुखी सांगीतली. बादशाहा मेहरबान  होऊन (दाभोळ )  मामल्याची देशमुखी  वतन  ( पिलाजीरावांस ) महामत केले.  वतनाचा भोगवटा  व्हावा  तो कैलासवासी  ( शिवाजी महाराज ) छत्रपती थोरले स्वामीस तळकोकण कबज जाले. त्या प्रसंगी वतनाचा भोगवटा झाला. ( शिव चरित्र  सहित्य खंड -

आता गणोजी शिर्के फितूर झाल्याचे जे पुरावे मिळतात ते पाहू. 

पुरावा क्रमांक -
पिलाजी शिर्के तानाजी शिर्के. गणोजी शिर्के हे महाराजांचे आप्त. ह्यांनी राजा वेडा झाला. कबजीने वश केले. राज्य बुडते. त्याअर्थी हिय्या करुन शिवाजीराजे ( संभाजी राजांचे पुत्र ) शिर्के यांचे भाचे ह्यास घेऊन राज्यावर बसवावे. राजाराम काढुन त्यांचे हातून कारभार चालवून राज्य रक्षावे. ऐसे राजकारण केले. फुटले ------ एक दोन शिर्के सापडले. ते (संभाजीराजांनी ) मरिले. शिर्के जेथे असतील तितके मारावे. ऐसी आज्ञा (संभाजीराजांनी ) करुण शिरकाण करविले. ते समयी दौलतराव शिर्के, गणोजी देवजी शिर्के वगैरे पळोन सर्व शिर्के तितके कुटुंबसुद्धा हबसाणात गेले. चहुकडे  चार जाऊन मोगलाईत जाऊन चाक-या करु लागले.
 ( संदर्भमल्हार रामराव बखर)
 

पुरावा क्रमांक  -  
शिरके ह्याणी विचार केला की, ह्या कलशाने राज्यास बुडविले. ह्यास नेऊन मारावे. म्हणोन २५ हजार इसम मेळविले. हे वर्तमान  कोन्हेरपंत कबजीकडील कारभारी ह्याणी  कबजीस श्रुत केले. त्याने महाराजांस लिहून  शिरके  ह्याजवर  हल्ला  करविला.  लोक बहुत मारिले. त्याजवर पिलाजी  खिजमतगार गणुजी शिरके मोगलाईत गेले. ( संदर्भमराठी  साम्राज्याचे छोटी बखर )

पुरावा क्रमांक -
मोर्चाचे साधन करुन (छत्रपती राजराम ) महाराजांस ( जिंजी किल्ल्यातुन ) काढावे हे चांगले. त्याजवरुन मोर्चेबंदास मराठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्याचा शोध केला. (जिंजी ) किल्ल्याचे नैॠत्येस शिर्के ह्यांचे मोर्चे आहेत. त्यांत मुख्य  गणोजी राणोजी शिर्के आप्त. 
शिर्के ह्याणी आपल्या आप्तांचे  कबिले म्हणोन ( राजाराम) महाराजांच्या  तिघी स्त्रिया पुत्र दोघे (?) इष्टमित्रांच्या स्त्रिया वगैरे मंडळीसुद्धा आपल्या गोटास नेले. शके १६१८ घातानाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा ( २१ मार्च) दिवसीं  झुल्फिकारखान ह्याणी चंदीचा किल्ला घेतला.
संदर्भचिटणीस बखर.  


पुरावा क्रमांक  -
१० जुन १६९८. राजाराम छत्रपती ह्याणी खंडो बल्लाळ निळो बल्लाळ  महादजी रुद्राजी शामजी प्रभु सरदेशमुख मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल ह्यासी  वृत्तीपत्र ऐसे जे ------ तो चंदीच्या प्रसंगी विज्वर जाहाला. ते प्रसंगी राजश्री गणोजी शिरके  रामजी शिरके  ह्याणी विनंती केली कि, मामले दाभोळचे  देशमुखीचे  वतनाचे फर्माने आदिलशाहा पादशाहा ह्याणी आपल्या वडिलास करुन दिल्हे होते.  ते वतन आपले आपणास करुन दिल्हे पहिजे. ह्याजवरुन  स्वामीनी ते वतन शिरके ह्यास दिले. ( संदर्भचि. सं. मा. . पत्रे)   
जिजीच्या वेढ्यातुन राजाराम महाराजांना बाहेर काढ्ण्यासाठी मोजलेली किंमत.

पुरावा क्रमांक  -
कवि कलश ह्याजवरी शिरके पारखे जाले. कवि कलश पळोन खिळण्यावर गेला. संभाजी राजे रायगडाहून कलशाचे  मदतीस आले. समागमे स्वारी (जाउन) सिरकीयांसी युद्ध करून त्यास पलउन खेळणीयास आणले. ( जेधे शकावली)
ह्याची साक्ष देताना राजारामराजे  राज्ञी ताराबाई साहेब कालीन कागादपत्रांतील एक  कागद सांगतो कि,
त्याउपरी सिरकियाचे धामधुमीकरता  कबजीबाबा खिलणियास शके १६१० कार्तिक मासी ( ऑक्टोबर १६८८) गेले. सेवेच राजश्री स्वामी (छत्रपती संभाजीराजे) तेथे आले. 
 

पुरावा क्रमांक -
२८ मार्च १७३४. श्रीराजाशाहु छत्रपतीविसाजी खंडेराव चिटणीस ह्यांना लिहितात ---- “त्यानंतर ( छत्रपती राजारामराजे ) चंदीस जाऊन ( आपले  पिताश्री  खंडो  बल्लाळ  ( बाळाजी) ह्यांनी तेथेही सेवानष्ठे  केली. तेथे संकटाचा प्रसंग प्राप्त होऊन  निघ्स्णे दुर्घट पडले असतां झुलपकारखान गणोजी शिर्के  ह्यांस ( प्रंमाण  ) देऊन त्यांचे मोर्चातुन ( छत्रपती राजाराम राजे) ह्यांस पाळण्यात बसवुन काढुन घेऊन देशीची सेवा केली.” ( संदर्भमहाराष्ट्र  इतिहासाची साधने, विभाग )

पुरावा क्रमांक -
राजारामराजे  - राज्ञी ताराबाई कालीन एका पत्रांत उल्लेख येतो. तो असाराजाराममहाराजांनी राजश्री नरसो सुरा देशाधिकारी तर्फ खेळणा ह्यांस १० एप्रिल १६८९ रोजी लिहिलेल्या पत्रांत मजकुर येतो कि,
मौजे पाडळी तर्फ देवळे  ह्या गांवची खोती विठ्ठल नारायण ह्यास बहुत दिवस होती. सांप्रत ( गणोजी) शिर्के ह्यांची सोबत केली. ह्याप्रसंगी कवि कलश येऊन त्यावरी निमित्य ठेऊन त्यासी धरून विषाळगडी बदीत ठेवले. घरदार लुटुन गुरे शेत आदी करुन सर्वहि दिवाणात नेले.

 


आता आमच्या मराठा समाजाने ठरवायचे आहे कि अस्सल दस्तावेज आणि पुराव्यांच्या आधारे आपला इतिहास शोधायचा कि कोणताही आधार नसलेला आणि ब्राम्हण द्वेषाने माखलेला खोटा इतिहास आपला इतिहास म्हणून डोक्यावर घ्यायचा???

माझी माझ्या मराठा समाजातील तरुणांना एवढीच विनंती आहे कि, कोणत्याही उपटसुंभावर डोळे झाकून विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतः अभ्यास करून आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधूया.

आणि बिग्रेडीना आव्हान आहे कि, " असेल हिम्मत तरच आडवे या…….




४२ टिप्पण्या:

  1. हाच अभ्यास आजच्या साऱ्या समस्यांचे उत्तर आहे. कदाचित या अभ्यासातुन शिवद्रोही ब्राह्मणांचीही माहिती येईल. पण ती पुरावाजन्य असेल. कृष्णाजी भास्कर याने महाराजांवर वार केला हे कोणीतरी नाकारले आहे का ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरे आहे तुमचे. अफझल खानाच्या पदरी असलेल्या कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर वार केला हे कोणी नाकारले नाही तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी शेकडो वार शिवाजी महाराजाना सुखरूप ठेवण्यासाठी झेलले हे हि कोणी नाकारले नाही.
      खुद्द छत्रपती नी अष्ट प्रधान मंडळात सात ब्राह्मण ठेवले होते. खुद्द छत्रपतीनी मातृवत असणारया (पितृवत अथवा गुरुवत म्हणाल्यावर अजून वाद व्ह्यायचा) सोनोपंतांची महाबळेश्वर येथे तुला केली (मातोश्री जिजाउञ्च्या तुलेसोबत).

      तुमच्या टिपण्णी मधून ब्राह्मण द्वेष दिसतो. स्वराज्यासाठी वेळोवेळी अनेकांनी योगदान (अनेक त्याग प्रसंगी बलिदान) दिले आहे - वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर,टिळक, गोपालकृष्ण गोखले, रानडे, आगरकर, साने गुरुजी किती नावे घ्यावी...?

      महाराष्ट्रासाठी लढा देणार्यात अग्रणी आचार्य अत्रे,महाराष्ट्रासाठी अर्थमन्त्रिपदाचा राजीनामा देणारे चिंतामणराव देशमुख ब्राह्मण होते (चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणणारे स. का. पाटील कुठे?)

      आत्मपरीक्षणासाठी उदाहरणे दिली, कृपया जाती द्वेष थांबवा एवढीच मनःपूर्वक विनंती.

      हटवा
    2. Fyi, बाजी प्रभू, सी डी देशमुख प्रभृती कायस्थ होती, ब्राह्मण नाही. आणि मुंबई चे यावच्चंद्र दिवाकारो वाले स का पाटील मात्र गोमंतक सारस्वत ब्राह्मण होते.

      हटवा
    3. मूर्ख mansa jati mdhe साडे बारा जाती असतात tu कुठल्या जातीचा आहेस, tu सांगणार ka आम्हाला ti konti brahmin hote tar गोमंतक होते हे होते ते होते खरा जातीयवादी tar तुझ्या कमेन्ट वरून आम्हाला tu दिसतो आहेस

      हटवा
    4. खरंय प्रत्येक जात जर आपल्याजातीला शोभेल आसा इतिहास बनवायला लागला ना तर प्रत्येक जातीचा अक स्वतंत्र इतिहास तयार होईल. आता स्वतचं डोकं नाही तिथं न चालवता दिलेला इतिहास परत वाचा बाजी प्रभू आसू किंवा मुरारबाजी देशपांडे ,खंडो बल्लाळ आसो किंवा बालाजी विश्वनाथ , कुद्ध कवी कलश सुध्धा ब्राम्हण पण मुख्य असे की या सर्वात जात कुठेही येत नसून यात रजनिष्टा ही दिसून येते आत्ता पर्यंत प्रत्येक ठिकाणी ब्राम्हण सगळ्यांना अकत्रित घेऊन जाण्याचा प्रयत्न करते पण आम्ही जातीने मराठा हे राज्य आमचे कारण स्वराज्याचे नाव मराठा आसे होते मित्रांनो मराठा म्हणजे प्रत्येक मराठी माणूस शिवछतरपतींच्या काळात जातीचे राजकारण झाले नाही तुम्ही का करताय


      जर तुम्ही शिव विचारी आसल तर तुमचा मनात कधीच जातीवाद येणार नाही जे झाले ते झाले आता इतिहास बदलता येणार नाही पण आता येवढ्या अफाट कष्टाने मिळावलेल्या भारत सुखाने नांदत असताना कशाला हा जातीभेद??

      मित्रांनो ना स्वराज्य फुकट मिळवला होता ना हा भारत देश महाराजांचा विचारांचे विसाव्या शतकातले खूप मोठे रामराज्य टिकवायचे का घालवायचे हे आपल्याच हातात आहे

      इथ कोणतीही जात नाही हा भारत आहे हा शिवरायांचा भारत देश आहे. हेच ते विसाव्या शतकातले स्वराज्य.......

      खूप झाला आता जातीभेद!!

      हटवा
    5. मित्रांनो, जाती-जातीत भांडणे लाऊन, हिंदु धर्म नष्ट करण्याची स्वप्ने अनेक हिंदु विरोधक बघत असतात. नाव मात्र हिंदु रक्षक छत्रपतींचे लावतात. त्यांची पासून सावध रहा.

      हटवा
    6. Mi khedekarancha samarthak nahi.mala he mahit aahe ki te sandarbhashivsy boltat.pan ek goshta mala aaj paryanta nahi samjliki shivaji maharajanni ashtapradhan mandal banvit astanna kthle pan pad vanshaparmapa pad nasel hyachi tajvij karun thevli hoti.pan bajali vishvnath yanchya pasau peshve pad vansha parampara pad kase Kay zale.kahi jadu keli Kay? Yachi pan thodi mahiti dyavi.

      हटवा
    7. हिन्दू साम्राज्य स्थापक् थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी शूरवीर बाजीराव याच्या पराक्रम व छत्रपती निष्ठा बघून पेशवे पद दिले..परंतु बाजीराव नंतर 1740 ला छत्रपती शाहू शूरवीर राघोजी भोसले यांना पेशवे पद देणार होते.परंतु पेशवे कंट्रोल दरबारातील पंत व सरदार यांचा वापर करून कटकारस्थानं द्वारे नाना साहेब यांनी पेशवे पद मिळविले..1749 छत्रपती शाहू स्वर्गवासी झाल्यानंतर नाना साहेबांनी छत्रपती घराणे कंट्रोल मध्ये ठेवून मराठा साम्राज्य अनधिकृत कब्जा करून नाना ची लबाड पद्धती प्रमाणे पेशव्यांनी पुढे पेशवाईराज्य केले...( टीप..मी छत्रपती निष्ठा असलेल्या त्या सर्व ब्राम्हण व्यक्ती कार्यास मानतो..मी जो खरा इतिहास तो लिहिला आहे...)

      हटवा
    8. बाजी प्रभु आणी मुरार बाजी हे ब्राम्हण नव्हतेच ते कायस्थ क्षत्रीय होते

      हटवा
  2. महाराजां ना त्रास देणाऱ्या म्हणा किंवा त्याना स्वराज्य स्थापनेत अड़चन आनणाऱ्या म्हणा लोकांची यादि करायची ठरवाली तर
    आम्हा मराठा समाजाला खुप अडचणी ची ठरेल
    आता खेडेकरांच्या पुस्तका पासून माझ्या सारख्या सामान्य माणसाला खरा इतिहास समजून घ्यायची इच्छा झाली म्हणून

    पुरावे शोधायचा छंद लागला तर
    आम्हा मराठ्यांची यादिच तैयार झाली

    आणि आशी यादि द्यायची म्हणलि तर
    महाराजांच्या नातेवाईकां पासून सुरुवात करावी लागेल
    अगदी खासे खासे मराठा आहेत ह्या यादि मधे

    तेंव्हा आम्हा मराठ्यांनी फार खोलात शिरू नये ही विनंती आहे

    नाही तर खुप स्पष्ट लिहावे लागेल

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Yadya maratyanna pan deta yetilach ki. Tumhalach fakta khara itihas vachta yeto ase nahi.abhyas aamcha pan barach zalay.aani mharathe kholat na shirnya chi bhasha vapru naka.rajyabhishekas koni virodh kela kela he Jase aamhas mahit aahe tasach ramdas swaminni rajyabhishekache samrathan kele he suddha aamhas kalte.aani tumhalach khup sphasht lihavayachi savay asel tar lihach.himmat asel tar.mag aamhi pan ek yadi deto.ti Jara not vachun ghyal

      हटवा
  3. महाराजां ना त्रास देणाऱ्या म्हणा किंवा त्याना स्वराज्य स्थापनेत अड़चन आनणाऱ्या म्हणा लोकांची यादि करायची ठरवाली तर
    आम्हा मराठा समाजाला खुप अडचणी ची ठरेल
    आता खेडेकरांच्या पुस्तका पासून माझ्या सारख्या सामान्य माणसाला खरा इतिहास समजून घ्यायची इच्छा झाली म्हणून

    पुरावे शोधायचा छंद लागला तर
    आम्हा मराठ्यांची यादिच तैयार झाली

    आणि आशी यादि द्यायची म्हणलि तर
    महाराजांच्या नातेवाईकां पासून सुरुवात करावी लागेल
    अगदी खासे खासे मराठा आहेत ह्या यादि मधे

    तेंव्हा आम्हा मराठ्यांनी फार खोलात शिरू नये ही विनंती आहे

    नाही तर खुप स्पष्ट लिहावे लागेल

    उत्तर द्याहटवा
  4. हा सगळा ब्राह्मणांनी रचलेला हितिहास आहे.स्वरजयचे खरे दुश्मन ब्राह्मण होते. जर गणोजी शिर्केनी गद्दारी केली असती तर संताजी आणि धनाजी यांनी सर्वात अगोदर गणोजी शिर्के ला मारलं असत.तसच असत तर शाहू महाराजांनी शिर्केची मुली बरोबर लग्न केलं नसत

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Hitu, ह्याच अर्थाने ब्राह्मण महाराजांचे हीत शत्रू असते तर महाराजांच्या मंत्री मंडळात 7 ब्राह्मण महाराजांनी ठेवले नसते. महाराजांना माणसे पारखान्याची चांगली कला अवगत होती.

      हटवा
    2. भावांनो बरोबर आहे काय हसण्या सारखी गोष्ट आहे ही शाहू महाराजांचा जर लिहीत आसाल तर शाहू महाराजांनी ज्यांचा हातात पुर्ण स्वराज्य दिले ते शिर्के होते का?? ते होते पेशवे बालाजी विश्वनाथ भट (ब्राम्हण) त्याचे कारण सांगू शकता का?

      हटवा
  5. बामनानो गप बसा....तुमिच धर्माची वाट लावलीत

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो काय गाढवाच्या बच्चा मग tu का नाही लिहिला इतिहास tuzyat दम asrl तर tu लिहायचा होता हरामखोरा

      हटवा
  6. जगात भारी शिवाजी राजे महाराज की जय हो

    उत्तर द्याहटवा
  7. धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय हो

    उत्तर द्याहटवा
  8. हे सगळ बामनामुळे झालय याच्यावर कोणीसुधा विश्वास ठेउ नये

    उत्तर द्याहटवा
  9. जर चिटणीस इतिहास माहीत असेल तर चिटणीस फॅमिली ला गणोजी राजे शिर्के व संभाजी राजे ह्यांच्यावर राग होता . सूडबुद्धीने चिटणीस बखर तसेच तत्सम साहित्यातून त्यांनी दोघांवरही राग काढला व मराठ्यांची वाट लावली

    उत्तर द्याहटवा
  10. खेडेकरांनी बरीच पुस्तके ब्राह्मण बदनामीसाठी लिहिलीत, त्यात इतिहास कमी शिवराळ भाषेत ब्राह्मणानाची बदनामीच आहे. खटला दाखल झाल्यावर हा वीर लोटांगण घालीत कोर्टात लिखित माफी मागतो ! मीं लिहिलेल्या एकाही गोष्टीला संदर्भ नाही म्हणून कबूल करतो. नेट वर ह्याचा माफीनामा उपलब्ध आहे.आजही विकृत खेडेकर प्रवृत्ती ब्राह्मणांचे विरुद्ध कट कारस्थाने करीतच आहेत. कारण एवढी अल्प संख्या असलेले ब्राह्मण शास्त्रा पासून शस्त्रात इतरा पेक्षा निपुण कसे, शस्त्र तर काही लोकांची तर मोनोपल्लीच होती.
    कृपया अफझल खाना बरोबर आलेल्या त्या 32 मराठे सरदारांची नांवे प्रकाशित करावी.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Ho nakki prakashit kara.pan sobat sobat aadilshaha,nijam shaha,Mughal yanchya padri asnarya fakta maratyanchich nahit tar sarvach jayinchya lokanchi Nava liha.sarva mhanje sarva

      हटवा
    2. Mi khedekar sarkhyanchi faltuchi pivli pustke vachit nahi.aani tyanna manat pan nahi.parantu var lekhkani evhda aatapita karun chitnis bakhar Cha sandarbha dila parantu tyanna vasi bendre chya sanshodhan sandarbha dyavasa vatla nahi he kahi samjat nahi

      हटवा
  11. छत्रपती चा विरोधी धर्म नव्हतं
    विरोधात होते ते धूर्त कपटी लालची लोक
    मग त्यात ब्राह्मण आहेत व त्यात मराठे पण आहेत
    स्वामीनिष्ठ फक्त मराठे किंवा ब्राह्मण हेच नव्हते छत्रपती चे स्वामिनिष्ठ मुस्लिम पण होते

    उत्तर द्याहटवा

  12. जर चिटणीस इतिहास माहीत असेल तर चिटणीस फॅमिली ला गणोजी राजे शिर्के व संभाजी राजे ह्यांच्यावर राग होता . सूडबुद्धीने चिटणीस बखर तसेच तत्सम साहित्यातून त्यांनी दोघांवरही राग काढला व मराठ्यांची वाट लावली

    उत्तर द्याहटवा
  13. छत्रपती चा विरोधी धर्म नव्हतं
    विरोधात होते ते धूर्त कपटी लालची लोक
    मग त्यात ब्राह्मण आहेत व त्यात मराठे पण आहेत
    स्वामीनिष्ठ फक्त मराठे किंवा ब्राह्मण हेच नव्हते छत्रपती चे स्वामिनिष्ठ मुस्लिम पण होते
    Jast kholat janya peksha punha sanghatit wha va Maharashtra cha ithas puna ek da Bharata madhe Dakhawa ( IAS,IPS, IRS) var Marathi basawa

    उत्तर द्याहटवा
  14. तर्क मुर्खपणाचे आहेत.

    जर गणोजी शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिले होते तर मराठा सरदारांनी सर्व प्रथम त्यांचा वध केला असता. तसं नाही.

    संभाजी महाराजांनी ज्या ज्या लोकांना शिक्षा केली ते कोण होते हे लक्षात न येण्यासारखे मुर्ख नाहीत मराठे. Brahmins and their Network then which is Ramdashis has strong motives to kill Sambhaji so the Ganoji Shirke story is cooked up as conspiracy theory to save the ass of Brahmins. Ganoji had already joined mughals and issue was known. If that was the case why did Ganoji saved Rajaram Maharaja and family?

    उत्तर द्याहटवा
  15. अरेरे madarchood जरा वाच ना नीठ
    खंडो बल्लाळ यांनी स्वतःला मिळालेले वतन गणोजी शिर्के ना दिले तेव्हा गणोजी शिर्के नी राजांना जिंजी च्यां वेढ्यातून बाहेर काढले




    खंडो बल्लाळ यांचे शब्द

    वतन च्याा तुकड्या पेक्षा मला रजपरीवार चा
    व राजांचा जीव महत्वाचा........

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Kon khando ballal aale hote ka Tula he shabda sangayla.are murkha jya svarajya madhe vatan denyachi paddhat navhti tithe khando ballalji la vatan kuthun milnar,aani tyanni te vatan ganoji shirke nna dile.khahi pan boltos Kay tu.akkal aahe ka thodi tsri tula

      हटवा
  16. तुम्ही स्वतः च्या जातीची इतकी बाजू मांडता आहात मग अशी किती नावे सांगू तुम्हाला ज्यांनी छत्रपती च्या इतिहास ची बदनामी कारक मांडणी केली आहे आणी अधून मधून काही नालायक तुमची विकृत माणसं काही पण लिखाण करत असतात यावर पण जरा बोला

    उत्तर द्याहटवा
  17. मुसलमान परवडले पण बामण, जाईल तिथे गु खाईल, मयताचे सोडत नाहीत हे स्वराज्याचं खायचं काय सोडतील. ह्यांना कुत्रे म्हणावे तर बिचाऱ्या कुत्र्याचा अपमान होईल. हत्तीचा पायी दिल्यापासून बिथरलेत ही घाऱ्या डोळ्यांची साप. विषारी सर्प ज्यांना कळतो पैशाचा दर्प. पूजा केल्यानं फायदे होत असते तर हे कशाला दुसऱ्याचा दारी मम म्हणायला गेले असते

    उत्तर द्याहटवा