शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

आपल्या सनातन संस्कृतीची आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगी - पंचगव्य !!


आपल्या ऋषीमुनिनी मनुष्याच्या गरजा ओळखून रोजचे जीवन गोवंशाबरोबर जोडले होते. त्याकाळी संस्कृत हीच शास्त्रोक्त भाषा होती. त्यामुळे शास्त्रोक्त तसेच वैज्ञानिक ज्ञान संपूर्ण संस्कृत भाषेतच वर्णन केलेले आहे. इंग्रजांनी भारतात आल्यावर भारतीयांची स्वस्थतेची करणे जाणून घेऊन ती नष्ठ करण्यास सुरुवात केली. जिला आम्ही 'गोमाता' संबोधतो तिलाच आमच्यापासून दूर केले. परंतु आपल्या रोगी समाजावर निरोगी गोवंश हेच एकमेव उत्तर आहे.

गायीच्या शेणामध्ये असणा-या Rizobium आणि Azetobacter नावाच्या जीवाणूंमुळे जमिनीतील आवश्यक पोषक अंश उपलब्ध होतात. तसेच शेण, गोमुत्र आणि गुळापासून बनवलेले पाणी ठराविक मात्रेत वापरले असता झाडाना अधिक फायदा होतो म्हणजेच ते वनस्पतींचे खाद्य आहे. यामुळे जमिनीत असणारे आणि झाडांना उपयोगी ठरणारे पोषक अंश ब-याच प्रमाणात झाडांना उपलब्ध होतात. त्यांचे उत्तम पोषण होते आणि त्यामुळे अधिक उत्पादन मिळते. ठराविक वेळेत गोमूत्रापासून बनविलेले कीटकनाशक वापरल्यामुळे वनस्पतींना हानी करणारे कीटक, जीव, जंतू त्या वातावरणापासून दूर पळतात. याचे आंतरराष्ट्रीय पेटंट गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापूर, नागपूर यांना मिळाले आहे. गोमुत्रामध्ये नैसर्गिकरित्याच vitamin, Sodium, Phosporus, Copper, Urea यांचे अंश असतात. अजूनही काही घटक असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. गोमुत्रामध्ये Antifugal, Antimiorobial, Anti-bacterial, Antioxident, Anti Cancer घटक द्रव्ये असतात. त्यामुळेच कदाचित गोवंश आधारित शेती समृद्ध होती. बैलगाडी आणि बैलांचा नांगर शेतात फिरत राहिल्याने नकळतच त्यांचे शेण आणि गोमुत्र मातीत मिसळत राहिल्याने जमीन समृद्ध होते.

गोवंशाच्या मृत्युपर्यंत त्याचे शेण व मूत्र अखंड प्राप्त होते. दुध मात्र फक्त गायीपासून मिळते तेही तच्या १/३ आयुष्यातच. असे असताना केवळ दुधाच्या आधारे गायीच्या फायद्याचा विचार केला गेला. तिचे दुध मिळणे बंद झाल्यावर ती निरुपयोगी वाटू लागली व तिच्या विक्रीचे विचार शेतक-यांच्या डोक्यात येऊ लागले. 'गोमय बसते लक्ष्मी !' हा सिद्धांत आपण विसरलो.

गायीपासून मिळणा-या दुध, दही, तूप, गोमुत्र व गोमय (शेण) या पाचही द्रव्यांना आयुर्वेदाने पंचगव्य म्हटले आहे. ज्याचा आयुर्वेदिक औषधात ब-याच ठिकाणी उपयोग केला जातो.

आयुर्वेदाप्रमाणे निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी शेणापासून बनवलेल्या गोव-या, तूप आणि काही वनस्पतींनी अग्निहोत्र, मंजन, कोळसा स्नानासाठी गोवरी जाळून केलेल्या राखेचा उपयोग, केस धुण्यासाठी गोमुत्र ( Anti - Danruff and conditiones ) तसेच अंजन बनवण्यासाठी गायीच्या तुपाचा दिवा, शेणापासून बनवलेली धुपबत्ती यांचा नियमित वापर केला.

जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर तूप घेतले असता भूक आणि पचनशक्ती वाढते. सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते. शरीरातील सर्व मासपेशी आणि सांधे कार्यक्षम राहतात. नेत्रशक्ती आणि स्मृती वाढते. निरोगी, स्वदेशी गायीचे दुध, दही, लोणी, ताक आणि तूप शरीराचे उत्तम पोषण करते. आहार, विहार अयोग्य असेल तर शरीरामध्ये निरनिराळ्या रोगांची उत्पत्ती होते. अशावेळी गोमुत्राचा वापर शरीरातील अपरिचित घटकांना बाहेर काढण्यासाठी होतो. म्हणूनच आपले आरोग्य ठीक ठेवायचे असेल तर गोवंशाचे निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवंशाला नियमित हिरवा चारा, पाणी, कडबा, ढेप, पेंड, गवत आणि रोजच्या रोज गायरानात फिरणे आवश्यक आहे. नियमित वेळेत तिला पशु वैद्याकडून तपासून घेतले पाहिजे.

कामधेनु, गोमुत्र, अर्कावर संशोधन करत असताना त्यासाठी पेटंटचे काम केले गेले. त्यासाठी गोमुत्राचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला गेला. ज्या गोवंशाचे गोमुत्र औधाधी उपयोगात आणायचे असेल ते मनुष्याचे अन्नसेवन करणारे नसावे, असे शास्त्रवचन आहे आणि ते त्या प्रयोगानी सिद्ध झाले आहे.

गायीच्या गोव-या ज्या वातावरणात जाळल्या जातात त्याने तो संपूर्ण परिसर शुद्ध होतो हे बनारस विश्व विद्यालयाने सिद्ध केले आहे.

पंचगव्याचे गुणधर्म -

१. गोदुग्ध - दृष्ठीसाठी हितकार, स्मरणशक्तीवर्धक, गर्भिणी तसेच गर्भाचे पोषण करणारे, शुक्रधातुंची वाढ करणारे असून त्यात vitamin A विशेषत्वाने असते.

२. गो-दधी - अग्निवर्धक तसेच अतिसार ( जुलाब) यात हितकर.

३. गो-घृत - या आधी वर्णन केलेल्या गुणांसोबतच जखम लवकर भरण्याचा गुणधर्म यात आहे.

४. गोमुत्र - यात क्षारांचे गुणधर्म आहेत जे विषघ्न आहे.

५. गोमय - याचे चूर्ण, राख, काढा, कोळसा तसेच ताजे गरम गरम शेण उपयोगी आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारे माणसासाठी हानीकारक जीवाणू याच्या धुराने त्या परसरापासून दूर जातात. म्हणून कदाचित होळीच्या दिवशी ठिकठिकाणी एकाच वेळी होळीमध्ये जाळल्या जन-या गोव-या / शेणी संपूर्ण गावातील जीवाणू पळवून लावण्यासाठी केलेली उपाययोजना तर नसेल???

एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कारानंतर संपूर्ण घर शेणाने सरावले जाते. एवढेच नव्हे तर अंत्ययात्रेमध्ये गोव-यांचा धूर आधी आणि नंतर शव वाहून नेले जाते. बनारस विश्व विध्यालयात यज्ञामध्ये वापरल्या जाणा-या सामिधांच्या औषधी, गायीचे शेण आणि तूप यापासून बनवलेल्या धुपबत्तीचे परीक्षण केले असता त्यामध्ये वातावरण शुद्ध करण्याची क्षमता दिसून आली. एकट्या गायीपासून आपल्याला शरीरपोषक, रसायन, वाजीकरण, शरीरशोधन, पर्यावरण शुद्धी, जमिनीचे पोषण व कीटक नियंत्रण इ. गोष्ठी मिळू शकतात. म्हणूनच दैनंदिन जीवनात पंचगव्याचा समावेश होणे आवश्यक आहे.

आजारी पडल्यावर पंचगव्याच्या वापरणे अथवा त्यापासून बनवलेल्या औषधाने बरेच आजार दूर होतात.

वाट, पित्त व कफ या त्रिदोषांमुळे रोगांची उत्पत्ती होते. गोमुत्रामुळे प्रामुख्याने वातापासून व कफापासून होणारे रोग बरे दूर होतात. एक्झिमा, सोरीयासीस, पांढरे डाग इ. आजारांमध्ये गोमुत्राचा उपयोग सिद्ध झाला आहे. लिव्हर सिरोसीस सारख्या आजारात तर गोमुत्राचा आयुर्वेदीय प्रभाव सिद्ध झाला आहे. कधी कधी पोट साफ नसल्यामुळे अएक आजार दिसून येतात. अशावेळी गोमुत्र वटी किवा गोमुत्र घेतले असता पोट साफ होते. ज्यांना जुनाट दमा आहे त्यांना गोमुत्रासव आणि विभितकावलहे प्रभावी आहे.

वातव्याधींमध्ये औषधीसिद्ध हिंग्वाद्य घृत, वारंवार गर्भपात, वंध्यत्वासाठी फलघृत तसेच व्रणासाठी कडूनिंब, हळद यांनी सिद्ध केलेले जात्यादी घृत वापरले जाते. गायीच्या तुपापासून बनलेल्या अनेक औषधी आज व्याधी निवारणासाठी वापरल्या जातात.

मंजीष्ठासारखी चूर्णे, गोदुग्ध यांनी तयार केलेले चंदनादी यमक तसेच मुलतानी माती व गोमययुक्त उटणे इ. गोष्ठीनी त्वचेची कांती सुधारते. वारंवार जुलाब होणे, ग्रहणी यांसारख्या आजारात ताक्ररिष्ठ उपयोगी पडते. पंचाकार्मातील वामन, विरेचनापुर्वी गायीचे तूप प्यायला दिले जाते. औषधीसिद्ध दुधाचा वापर बस्तीसाठी, तसेच ताक्रधारा इ. चिकित्सा प्रचलित आहेत. आम संचित अवस्थेत गोमुत्राचा शोधन बस्ती किवा वजन कमी करण्यासाठी गोमुत्र आवश्यक आहे. अशा प्रकारे शास्त्रोक्त चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा उपयोग आहे.

संपर्क - प्रधान गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापूर, नागपूर.

( महत्वाची सूचना - हा लेख वैद्य. डॉ. नंदिनी भोजराज. एम. डी. (आयु) यांच्या वैद्यराज या त्रैमासिकात प्रकाशित झालेल्या लेखाचा काही भाग आहे. )





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा